राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने नुकतीच घोषणा केली आहे की १५ जुलै २०२५ पासून देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल भरणे बंधनकारक होणार आहे. यापूर्वी दुचाकींना टोलमधून सूट होती, मात्र आता ही सवलत रद्द करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील दुचाकीस्वारांना टोल नाक्यांवर टोल भरणे आवश्यक राहील. टोल भरण्यासाठी फास्टॅग वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. टोल न भरल्यास दंड आकारला जाईल. एनएचएआयच्या या नव्या धोरणामुळे अनेक दुचाकीस्वारांना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
प्राधिकरणाच्या मते, महामार्गांच्या देखभालीसाठी आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या बदलामुळे दुचाकी चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेकांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून, सरकारने पुन्हा विचार करावा, अशी मागणी केली आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews